पाणी टंचाई बाबत अडचण निर्माण झाल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा
पालघर दि. 02 (जिमाका): पालघर जिल्हयातील नागरिकांना सुचित करण्यात येते की, पाणी टंचाई कालावधीत नागरिकांकडून पाणी टंचाईच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया मध्ये निंयत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. सदर नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्रमांक – 02525-297474 हा असुन भ्रमणध्वनी क्रमांक- 8237978873 हा आहे. तरी पाणी टंचाई बाबत अडचण निर्माण झाल्यास वरील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.